By  
on  

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका सोडल्याच्या चर्चांवर संकर्षणने केलं मत व्यक्त

नेहमीच्या विषयांपेक्षा वेगळी गोष्ट मांडणारी गोष्ट म्हणजे, माझी तुझी रेशीमगाठ.’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या मालिकेतील समीरच्या व्यक्तिरेखेत दिसणारा  संकर्षण आता मालिकेत दिसणार नसल्याची चर्चा सुरू होती. 

 

 

पण एक व्हिडियो शेअर करत त्याने या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. यात तो म्हणतो. मला न विचारता, माझ्याशी काहीही न बोलता मी ही मालिका सोडणार असल्याची अफवा काहींनी पसरवली आहे. हे चुकीचं आहे. मी ही मालिका सोडणार नाही. तुमचं माझ्या कामावर आणि माझं प्रेक्षकांच्या प्रेमावर प्रचंड विश्वास आहे. २३ तारखेपासून नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरु होत आहेत. त्यामुळे माझी धावपळ होणार आहे. त्यामुळे मी नाटकंही करणार आणि मालिकाही करणार आहे.’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive