सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत आता नवं रंजक वळण येताना दिसत आहे. शालिनीने शिर्के पाटलांकडून त्यांचं सगळं वैभव काढून घेतलं आहे. गमावलेली प्रॉपर्टी पुन्हा मिळवायची असेल तर शिर्केपाटील कुटुंबासमोर सध्या एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे शालिनीविरुद्ध कबड्डीचा सामना जिंकणं. यासाठी संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत मेहनत घेतली आहे.
ऐन मोक्याच्या क्षणी गौरीने मैदानात एण्ट्री घेत कबड्डीच्या सामन्यात नवा ट्विस्ट आणला आहे. त्यामुळे हा सामना अधिक उत्कंठा वाढवणारा ठरला आहे. आता परिश्रम आणि एकीमुळे शिर्के-पाटलांनी हा सामना जिंकला आहे. पण यामुळे शालिनीची अवस्था मात्र वाईट झाली आहे. सामना हरल्याच्या धक्क्याने शालिनीच्या डोक्यावर परिणाम झालेला आगामी भागात पाहायला मिळणार आहे.