आई कुठे काय करते ही मालिकेत अनेक वळणं येतायत. काही दिवसांपूर्वी अरुंधतीच्या आयुष्यात तिच्या कॉलेजच्या काळातील मित्राची म्हणजेच आशुतोष केळकर याची एण्ट्री झाली. अभिषेक अनघाचं लग्न साग्रसंगीत पार पडल्यानंतर आता अरुंधती स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाटी देशमुखांचं घर सोडण्याचा निर्णय घेतेय. अाश्रमातील नोकरी, म्युझिक अल्बम व म्युझिक स्कूलच्या कामाला ती सुरुवात करणार आहे. आशुतोष व अरुंधतीची मैत्री अनिरुध्दला पहिल्यापासूनच पटत नाही. त्यात अनिरुध्द महिनोंमहिने घरी बसलाय. अरुंधती मात्र करिअरमध्ये पुढे जातेय हे त्याला सहन होत नाहीय.
अरुंधती रेकॉर्डिंगसाठी मुंबईच्या बाहेर गेली होती. तिथे आलेल्या काही अडचणींमुळे तिला आशुतोषसोबत बाहेर एक रात्र काढावी लागली. त्यावरून अनिरुद्ध आणि त्याची आई थेट तिच्या चारित्र्यावर संशय घेतात. हा अपमान सहन न झाल्याने या दोघांना खडे बोल सुनावत स्वाभिमानी अरुंधती देशमुख कुटुंबातून कायमस्वरुपी बाहेर पडते. अरुंधतीने घराबाहेर जाण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचे मालिकेच्या चाहत्यांनी भरभरून कौतुक केले.
देशमुख कुटुंबाने अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय करत घरातून बाहेर काढले त्यांच्यासमोर आशुतोष अरुंधतीवरील आपलं प्रेम खुलेआम व्यक्त करणार आहे. त्यामुळे यावर अनिरुद्धसह देशमुख कुटुंबाची प्रतिक्रिया कशी असणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच अरुंधती आशुतोषच्या यावर कशी प्रतिक्रिया देते हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.