येत्या ३ एप्रिलला स्टार प्रवाह परिवाराचा दिमाखदार पुरस्कार सोहळा रंगणार आहे. छोट्या पडद्यावरच्या लाडक्या मालिकेतले कलाकार एकत्र रंगमंचावर अवतरणार आहेत. या सोहळ्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत. तत्पूर्वी सुख म्हणजे नक्की काय असतं या लोकप्रिय मालिकेतील आणि मुरांबा या नव्या मालिकेतील कलाकारांनी नुकतंच कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतली जयदीप-गौरीच्या लाडक्या जोडीने अंबाबाईचं दर्शन घेतसलं.
मुरांबा मालिकेतील नायक शशांक केतकरने त्याच्या नायिकेसह देवीचं दर्शन घेतलंय.