स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते?’मध्ये दररोज काही ना काही नवे घडत आहे.या मालिकेच्या प्रत्येक भागाची रसिक प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अरुंधतीच्या शब्दाखातर अनिरुध्दने संजनाशी लग्न केलं खरं, पण यानंतर देशमुखांच्या घरातील शांतता मात्र पार हद्दपार झाली. ते हसतं-खेळतं घर पुरतं कोलमडलं.
या लोकप्रिय मालिकेत अनेक महिन्यांपासून संजनाचा पती म्हणजेच शेखर झळकला नव्हता. आता मालिकेत नवा ट्विस्ट येतोय आणि शेखरची धमाकेदार एन्ट्रीही होतेय. मात्र, त्याला पाहून संजना आणि अनिरुद्धचा तिळपापड होणार आहे.
शेखरच्या येण्याने अरुंधतीला एक नवी साथ मिळणार आहे. आल्या आल्या शेखरने संजनाला त्रास देण्यास सुरुवात केली आहे. आपण इथे का आलो याचं कारण सांगताना शेखर म्हणतो की, मी माझ्या वहीत थोर लोकांच्या सह्या घ्यायला आलो आहे आणि अरुंधती वहिनी तर सगळ्यात थोर आहेत.