By  
on  

आई कुठे काय करते : देशमुख कुटुंबापासून विभक्त होणार अभि-अनघा?

स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते?’मध्ये दररोज काही ना काही नवे घडत आहे. छोटया पडद्यावरची ही सर्वात लोकप्रिय ंमालिका. गेल्या अमेक दिवसांपासून या मालिकेत बरेच वाद-विवाद सुरु आहेत. संजनाने संपूर्ण घर हे अनिरुध्दच्या आईला फसवून स्वताच्या नावे केल्याने त्याच्या मनातून ती साफ उतरलीय. तर इथे अरुंधती सासू काहीही बोलल्या तरी त्यांच्या काळजीपोटी देशमुखांच्या घरात येऊन त्यांची आजारपणात काळजी घेतेय हे अनिरुध्दने अचूक हेरलंय. त्यामुळे आता अनिरुध्दच्या मानतही अरुंधतीचं स्थान बळकट झालंय, पण इथे आणखी एक ट्विस्ट आहे. अभिषेक आता देशमुखाचं घर सोडून जाण्याचा निर्णय घेताना पाहायला मिळतोय. तसा एक व्हिडीओसुध्दा सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये अनघा बोलते की मी घरात छान रमली आहे. तर अभि तिला बोलतो, मी स्पष्टपणे सांगतो मला इथं रहायची इच्छा नाही. मला कंटाळा आलाय, आपण वेगळे रहायला जाऊया. यानंतर अनघा चिंतेत दिसते…त्यामुळे आता अभिनं घर सोडल्यानंतर देशमुख कुटुंब वेगळं होणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. कारण अरुंधतीच्या जाण्यानंतर अनघानं संपूर्ण कुटुंबाला जोडून धरलं होतं. पण आता अभिषेकच्या मतांचा आदर करुन ती त्याला घर सोडण्याला साथ देणार का, हे दोघं खरंच वेगळे राहणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive