By  
on  

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत भावनिक वळण स्वराची आई घेणार जगाचा निरोप

कोण देणार न मले हात ग उशाला आई…

परतून निघन्याची एवढी कशाला घाई…

दिवसाच्या उजेडात जनू चांदवा रुसला…

रात व्हते घाबरतो जीव माझा चिमुकला…

अशावेळी तुझा आई हात सोडवत नाई…

परतून निघन्याची एवढी कशाला घाई…

 

आईला गमावल्यानंतर चिमुकल्या स्वराच्या मनाची अवस्था काहीशी अशी झालीय. आईचा जीव वाचवण्यासाठी स्वराने बरेच प्रयत्न केले. पण आपल्या आईचा जीव ती वाचवू शकली नाही. तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील हे अत्यंत भावनिक वळण आहे. मालिकेत हा भावनिक प्रसंग शूट करणं संपूर्ण टीमसाठी आव्हानात्मक होतं. सेटवर हा प्रसंग शूट करताना सगळेच भावूक झाले होते. चिमुकल्या स्वरानेही हा सीन साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली. या भावनिक प्रसंगासाठी एक गाणंही चित्रित करण्यात आलं आहे. दीप्ती सुर्वेने या गाण्याचे शब्द लिहिले असून रोहन रोहन या जोडीने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद फेम स्वरा बनसोडेने हे गाणं गायलं आहे.

आईला गमावल्यानंतर स्वराचा पुढील प्रवास कसा असेल? तिची आणि तिच्या वडिलांची भेट होणार का? स्वराची गाण्याची आवड कशी पूर्ण होणार या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या पुढील भागांमधून मिळतील. त्यासाठी पाहायला विसरू नका तुझेच मी गीत गात आहे रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive