By  
on  

स्वाभिमान मालिकेत लगीनघाई ! पल्लवी आणि शांतनू अडकले विवाहबंधनात

स्टार प्रवाहवरील स्वाभिमान मालिकेत सुरू आहे पल्लवी आणि शांतनूच्या लग्नाची धामधूम. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची सर्व आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. पल्लवी आणि शांतनूने संपूर्ण कुटुंबाच्या साक्षीने सप्तपदी घेतल्या. लग्नातल्या दोघांच्या पारंपरिक लूकला विशेष पसंती मिळत आहे. पल्लवी- शांतनूच्या आयुष्यात जरी आनंदाचे क्षण आले असले तरी मोठ्या आईच्या मनात मात्र नवं कटकारस्थान सुरू आहे.

सहा महिन्यांच्या आत पल्लवीचे सूर्यवंशी घराण्यासोबत असलेले संबंध तोडायला लावण्याची शपथ मोठ्या आईने घेतली आहे. त्यामुळे स्वाभिमान मालिकेचे यापुढील भाग उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही. तेव्हा पाहायला विसरू नका स्वाभिमान मालिका दररोज सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive