By  
on  

आई कुठे काय करते : आता गेलीस की परत येऊ नको, अनिरुध्द पुन्हा बरळला!

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे. अरुंधतीने आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशमुख कुटुंबातून बऱ्याच चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या. अनिरुद्ध, अभिषेक, कांचन यांनी तीव्र विरोध केला. मात्र यशआणि आप्पांच्या पाठिंब्यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात सुखाचं चांदणं येऊ पहातंय. अरुंधतीला मुलीच्या मायेने जपणाऱ्या आप्पांनी अरुंधतीची पाठवणी देशमुखांच्या घरातूनच होणार असं ठामपणे सांगितलं. त्यामुळेच अरुंधतीची हळद, मेहंदी आणि विवाह देशमुखांच्या घरातच होणार आहे. 

आशुतोषसोबत अरुंधतीचे लग्न ठरण्याच्या आधीपासून अनिरुद्ध त्यांच्या नात्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचे लग्न रोखण्याचे अनिरुद्धचे सारे प्रयत्न करून झाले, आताही त्याने अरुंधतीचा अपमान करण्याची संधी सोडली आहे.

सोशल मीडियावर 'आई कुठे काय करते'च्या आगामी एपिसोडचा एक प्रोमो समोर आला. ज्यामध्ये अनिरुद्ध अरुंधतीला ऐकवतो की, 'आता गेलीस ना की परत येऊ नको.' त्याचा आवाजाचा स्वर ऐकून उपस्थित सर्वांनाच धक्का बसतो, सर्वांनाच त्याचा राग येतो. अनिरुद्ध देशमुख कुटुंबियांना हेही ऐकवतो की, 'आता तुम्ही हिला उठसुठ बोलावणं बंद करा. ही घरात चपलाच घालून बसलेली असते, फोन आला की लगेच घराबाहेर जाते.'

 

अनिरुद्धने असा त्रागा केल्यानंतर कांचन असे म्हणताना दिसते आहे की, 'थांबवा हे सारं. कंटाळा आला आहे मला या सगळ्याचा. ज्यांना इथे राहायचं असेल त्यांनी इथे राहा, ज्यांना राहायचं नसेल त्यांनी न भांडण करता निघून जा.' आधीच्या एपिसोडमध्ये कांचनची अरुंधतीवरील नाराजी स्पष्ट दिसून आली होती. ती जरी अरुंधतीला लेकीसारखे मानत असली तर तिचं दुसरं लग्न कांचनला मनापासून पटलेलं नाही. तिने अरुंधतीला हळद लावण्यासही नकार दिलेला.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive