By  
on  

नाईकांच्या वाड्यात आलीये वच्छी, आता कोणता गजहब होणार?

झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने रसिकांच्या मनात वेगळं , स्थान निर्माण केलं आहे. भय, थरार यांचं योग्य मिश्रण असलेल्या या मालिकेचा दुसरा भागही रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेच्या प्रीक्वेलमध्ये आण्णा आणि शेवंतावर फोकस असला तरी आण्णांचा सतत द्वेष करणारी वच्छीनेही रसिकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे.

 

मुलगा काशीच्या मृत्यूनंतर वच्छी सैरभैर झाली आहे. जिथे तिथे तिला काशीचे भास होताना दिसत आहेत. काशी आता या जगात नाही हे सत्य पचवायला वच्छी अजिबात तयार नाही. तर नाईकांच्या वाड्यात सध्या आनंदी आनंद झाला आहे. दत्ताला मुलगा झाल्याने वाड्याला वारस मिळाल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. पण वच्छीला मात्र तिचा मुलगा काशीच दत्ताच्या मुलाच्या रुपात परत आल्यासारखं वाटत आहे. त्यामुळेच या बाळाला भेटायला ती नाईकांच्या वाड्यात आली आहे. पण हे आण्णांना कळालं तर? ‘रात्रीस खेळ चाले’चा पुढील भाग रंजक असेल यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive