By  
on  

आण्णा नाईक घालणार माधवचं श्राद्ध, काय असेल घरच्यांची प्रतिक्रिया

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत आण्णा नाईकांची दहशत मालिकेतील थरार कायम ठेवते. आण्णांच्या जबरद्स्त व्यक्तिरेखेत अभिनेते माधव अभ्यंकर यांनी जान आणली आहे. आण्णांचा दरारा केवळ त्यांच्या घरापुरताच मर्यादित नाही तर आख्खं गाव आण्णा नाईकांच्या धाकात आहे.

 

एरवी शेवंताबाबत सौम्य दृष्टीकोन ठेवणारे आण्णा कधी कधी तिच्याबाबत कठोर होताना दिसतात. पण आण्णांनी अलीकडेच कठोरतेच्या सीमा पार करण्याची कृती केली. आण्णांनी नुकतंच माधवचं श्राद्ध घातलं आहे. माधवने आण्णांनी ठरवलेल्या मुलीशी लग्न करण्यास नकार दिलाच. याशिवाय तो घर सोडूनही निघून गेला. तेव्हापासून आण्णांनी त्याचं नाव टाकलं आहे. घरात कुणालाही त्याचं नाव घेण्यास किंवा संपर्क साधण्यासही बंदी केली आहे. आता भरीस भर म्हणून आण्णांनी त्याचं श्राद्धही घातलं आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार याची उत्सुकता वाढली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive