By  
on  

आण्णांना टाळत आहे शेवंता काय असेल याचं कारण?

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा प्रीक्वेलही रसिकांच्या पसंतीला उतरत आहे. या मालिकेतील आण्णा आणि शेवंताच्या केमिस्ट्रीला रसिकांचा प्रतिसादही मिळत आहे. या मालिकेत आता नवा ट्वीस्ट आला आहे. काही दिवसांपुर्वीच पोलीस कोठडीतून आण्णांची सुटका झाली आहे. शोभावर गोळीबार केल्यामुळे आण्णांना पोलीस पकडून नेतात. पण तिथून सुटल्यानंतर आण्णा शेवंताला भेटण्यासाठी येतात.

 

आण्णांच्या या कृत्याने घाबरलेली शेवंता त्यांना टाळण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यासाठी पाटणकरांनी ऑफिसला सोबत घेऊन चलण्याची विनंती करते नाहीतर घराला बाहेरून कुलुप लावून जाण्यास सुचवते. पाटणकर तिचं म्हणणं ऐकतात, पण त्यांना वाटेत आण्णा भेटतात. शेवंताच्या विचित्र मागणीबद्दल ते आण्णांना सांगतात. शेवंता आपल्याला टाळत असल्याचं समजल्यावर आण्णांच्या अंगाचा तिळपापड होतो. ते जबरदस्ती दार उघडण्याचा प्रयत्न करतात. शेवंता आण्णांना भेटणार का? शेवंताच्या या वागण्यावर काय असणार आण्णांची प्रतिक्रिया काय असेल हे लवकरच कळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive