By  
on  

आण्णा नाईकांसोबत लग्न करण्यासाठी शेवंता तयार झाली पण....

लॉकडाऊनंतर पुन्हा मालिकांचं शुटिंग सुरु झालं आहे. प्रेक्षकांच्या भेटीलाही नवे एपिसोड्स येत आहेत. प्रेक्षकांच्या लाडक्या रात्रीस खेळ चाले मालिकेच्या शुटिंगलाही सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनपुर्वी आण्णा शेवंतासोबत लग्न करण्यासाठी तयार होतात हे आपण पाहिलं होतं. आता शेवंताने आण्णा नाईकांवर सुड उगवण्यासाठी त्यांच्याशी लग्नाचा घाट घातला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शेवंताची स्वप्ने मातीमोल ? #RatrisKhelChale2 #ZeeMarathi

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

 

शेवंताच्या घरात लग्नाची तयारीही सुरु आहे. तयार होऊन ती आण्णांची वाट देखील पाहात आहे. यावेळी नेने वकील आणि चोंगट्याही तिथे उपस्थित असतात. सर्वजण आण्णांची वाट पहात असतात. पण आण्णा मात्र येताना दिसत नाहीत. शेवंतालाही काळजी वाटते. शेवंताने लग्नाचा घाट घातला खरा, पण आण्णा येतील का लग्नाच्या ठिकाणी हे मात्र मालिका पाहिल्यावरच कळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive