करोना संकटामुळे जवळपास तीन महिने मालिका, सिनेमे आणि वेबसिरीज या सर्वांचंच शूटींग ठप्प होतं, पण नुकतंच पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यात थोडी शिथिलता आणत काही अंशी योग्य ते सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळत व योग्य ती खबरदारी घेत शूटींगला पुन्हा सुरवात करण्यास परवानगी दिली . यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला हायसे वाटले व प्रत्येकाने या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला.
अल्पावधीच लोकप्रिय झालेली मालिका 'अग्गंबाई सासुबाई' या मालिकेतही लॉकडाईननंतर अनेक बदल आणि पात्रांच्या व्यक्तिरेखा थोड्या हटके अंदाजात समोर येत आहेत. . परंतु या मालिकेतील पात्रांची सध्या सोशल मीडियावर प्रचंड खिल्ली उडवली जात आहे. प्रेक्षकांच्या प्रेमासोबतच सध्या या मालिकेला मोठ्या प्रमाणावर ट्रोलही केले जात आहे.. अशाच एका व्हायरल मीम्सवर मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
फेसबुक वरच्या एका युजरनं‘अग्गंबाई सासूबाई’वर एक फोटो शेअर करत मालिकेतील संवादाची खिल्ली उडवली . या युजरची ही पोस्ट वाचून गिरीश ओक यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी प्रतिक्रीया दिली.आम्ही तुमच्या मालिकेला प्रसिद्धीच मिळवून देतोय, आता आम्हाला पार्टी पाहिजे आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये खुर्च्या देखील राखीव हव्यात,असं त्या युजरनं म्हटल्यानंतर गिरीश यांनी या युजरला खडे बोल सुनावले. .गिरीश ओक म्हणतात... .‘तुमचा वेळ जातोय नं? मग झालं तर, वर पार्टी राखीव खुर्च्या म्हणजे जरा जास्तच होतंय. उलट तुम्हीच आमचे आभार मानले पाहिजेत. काहीही (बुद्धिही)खर्च न करता वेळ जातोय तुमचा. तुमच्या ह्या मनोरंजनाच्या खाद्याकरता आम्हाला जिवावर उदार होऊन रोज शूटला बाहेर पडावं लागतंय,’ अशी एक कमेंट गिरीश ओक यांनी केली.
याप्रकरणाची सोशल मिडीयासह संपूर्ण मालिकाविश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे.