By  
on  

‘प्रेम पॉईझन पंगा' ही मालिका आता निरोपाच्या उंबरठ्यावर

हटके लव्हस्टोरी असलेली मालिका म्हणजे ‘प्रेम पॉईझन पंगा’. जुई आणि आलापच्या या लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी उत्तम पसंती दर्शवली. पण या लव्हा स्टोरीमध्ये ट्वीस्ट आला तो जुईमुळे. जुई माणूस नसून इच्छाधारी नागीण असते. 
प्रेमात पडून ते लग्नापर्यंत झालेला या नात्याचा प्रवास अतिशय रंजक ठरला.

 

समंजस आलापच्या आयुष्यात पत्नी बनून आलेल्या जुईला काही नागीण असल्याने अडचणींचा सामना करावा लागला खरा पण आलापने वेळोवेळी तिला समजून घेतलं. तिचं नागीण असणं आलापने समजून घेतलं असलं तरी आता तिच्या  सासरच्यांसमोर येणार आहे. हेच या मालिकेचं अंतिम वळण आहे. ही मालिका 25 सप्टेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. या मालिकेची जागा आता कोणती मालिका घेणार हे अजून समजलं नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive