By  
on  

प्रियंका करतेय ‘भारत’ला अलविदा; हे खास कारण ऐकून व्हाल आश्चर्यचकित

बॉलिवूडची देसी गर्ल आता लवकरच परदेशी होण्याच्या तयारीत आहे. हॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी प्रियंका चोप्रा आणि निक जोन्स यांच्या प्रेम-प्रकरणाबद्दल तर आपल्याला चांगलंच माहिती आहे. आता या प्रेमात पुढचं पाऊल लवकरच उचललं जात असल्याचं दिसून येते.

जवळपास ब-याच वर्षानंतर प्रियंका चोप्रा ‘भारत’ सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार होती. या सिनेमात ती सुपरस्टार सलमान खानसोबत तब्बल दहा वर्षानंतर झळकणार होती. परंतु नुकतीच एक खास बातमी हाती आली आहे, आणि त्यानुसार प्रियंकाने हा सिनेमा सोडला असून तिने ‘भारत’ला अलविदा केले आहे. सिनेमा सोडण्याचे कारण ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार एवढं मात्र नक्की!

‘भारत’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या सिनेमात आता प्रियंका भूमिका साकारणार नाही, याचे खास कारण आहे प्रियंका व निकची वाढती जवळीक. हेच तिचं सिनेमा सोडणयाचं कारण असल्याचं अली अब्बास जफर यांनी नुकतंच एका ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

https://twitter.com/aliabbaszafar/status/1022673504536129541

दिग्दर्शक अली अब्बास जफर लिहितात, “ हो. प्रियंका चोप्रा आता ‘भारत’ सिनेमाचा भाग नसेल. याचं कारण खुप खुप स्पेशल आहे. प्रियंकाने आम्हाला सांगितलंय, की निकत्याच्या निर्णयाच्या खुप जवळ आहे. आम्हा सर्वांना हे ऐकून फार आनंद झाला आहे. टीम ‘भारत’कडून प्रियंकाला नव्या आयुष्यासाठी भरपूर प्रेम आणि आणि शुभेच्छा.”

अली अब्बास जफर यांच्या ट्विटमुळे साहजिकच प्रियंका आणि निकच्या नात्याविषयी आणखी उत्सुकता वाढली आहे. सर्वांनाच या दोघांची आनंदाची बातमी जाणून घ्यायची आहे. ‘भारत’सोबतच प्रियंका 'द स्काय इज पिंक’ हा सिनेमाचं चित्रिकरण सुरू करणार होती, कदाचित या सिनेमालासुध्दा ती रामराम ठोकू शकते. अजुनतरी या सिनेमाबद्दल काही निर्णय घेण्यात आलेला नाही.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive