By  
on  

‘विठूमाऊली’च्या भक्तीची सर्वांना पडली मोहीनी, मालिकेने गाठला महत्त्वाचा टप्पा

भक्ती रसाने ओथंबलेल्या ‘विठूमाऊली’ मालिकेने नुकताच ५०० भागांचा टप्पा पार केला आहे. रसिकांनी या मलिकेवर पहिल्यापासून अतुट प्रेम केलं आहे. या मालिकेत विठठ्ला आणि त्याच अवतार कार्य दाखवण्यात आलं आहे. भगवान विष्णूंची विठ्ठ्ल रुपात येण्यापासून ते पंढरपुर श्रीक्षेत्र बनण्यापर्यंत या मालिकेने रसिकांच्या मनावर चांगलीच मोहिनी घातली. त्यानंतर कलीच्या त्रासापासून संसाराला योग्य मार्ग दाखवण्याचा असो किंवा भक्त पुंडलिकाची कथा असो. या मालिकेत विठ्ठल रुपाशी निगडीत प्रत्येक कथा अगदी सुरस स्वरुपात मांडण्यात आली. या मालिकेत अभिनेता अजिंक्य राऊत विठ्ठलाच्या भूमिकेत आहे. एकता लबडे ही रखुमाईच्या भूमिकेत आहे.

https://twitter.com/KothareVision/status/1131087575806930945

आदिनाथ कोठारे आणि महेश कोठारे ही बापलेकाची जोडी या सिनेमाची निर्माती आहे. अविनाश वाघमारे हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. ५०० भाग पुर्ण झाल्याबदल मालिकेकडून रसिकांचे आभार मानण्यात आले आहेत. निर्मात्यांनीही भावनिक पोस्त लिहित रसिकांचे आभार मानले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive