By  
on  

बिग बॉसच्या घरात किशोरी ताई का झाल्या इमोशनल, जाणून घ्या कारण

बिग बॉसच्या घरातील लीलांना आता कुठं रंग चढत आहे. सदस्यांचं एकमेकांशी ट्युनिंग जरा कुठं जुळत असताना नवीन नवीन टास्क सुरु झाल्याने पुन्हा मतभेद होतात. किशोरी शहाणे घरातील सगळ्यात समंजस खेळाडू आहेत. महेश मांजरेकरांनीही किशोरी यांचं उत्तम वागणुकीसाठी कौतुक केलं आहे. पण सयंमी किशोरी ताईंचा बांध मात्र फुटला असल्याचं समोर आलं आहे.

https://www.instagram.com/p/ByUeAgwAHbo/?utm_source=ig_web_copy_link

घरात सध्या ‘चोरबाजार’ नावाचा टास्क सुरु आहे. अशा वेळी काही सदस्यांनी किशोरी ताईंच्या वस्तू चोरण्यासाठी सदस्यांनी त्यांच्या सामानाची नासधुस केली शिवाय त्यांच्याशी उर्मट वर्तनही केलं. यामुळे किशोरीताई दुखावल्या गेल्या आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. यावेळी मैथिली आणि अभिजीत त्यांची समजूत काढताना दिसत आहेत. पण किशोरीताईंशी उर्मट बोलणारी ही व्यक्ती कोण आहे हे समजू शकलेलं नाही. हा टास्क पुर्ण होईपर्यंत घरात काय काय घडामोडी घडतात याची रसिकांना उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive