साहित्य संघातर्फे दरवर्षी जाहीर केल्या जाणा-या पुरस्कारामध्ये यावर्षी सर्वोत्कृष्ट स्री नाट्य कलावंत हा पुरस्कार अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना जाहीर झाला आहे. तर सर्वोत्कृष्ट गद्य कलावंत सन्मान अविनाश नारकर यांना मिळाला आहे. ऐश्वर्या नारकर यांनी अनेक नाटक, सिनेमे मालिकांमधून अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या त्या स्वामिनी मालिकेत गोपिका बाईंची भूमिका साकारत आहेत.
ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी अनेकदा एकत्र काम केलं आहे. यापुर्वी महाश्वेता, लेक माझी लाडकी या मालिकांमध्ये तर सोयरे सकळ या नाटकामध्ये एकत्र काम केलं आहे. या दोघांना एकत्र पुरस्कार जाहीर होणं हा देखील उत्तम योगायोग आहे.