By  
on  

 ‘काहे दिया परदेस’ मधील शिव गौ-री पुन्हा एकत्र आले भेटीला, हे आहे कारण

'काहे दिया परदेस' या मालिकेतील शिव आणि गौरी आता पुन्हा एकदा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. निमित्त आहे एका नव्या गाण्याचं. 

या प्रसिद्ध मालिकेत शिव आणि गौरी म्हणून प्रसिद्ध असेलेले कलाकार सायली संजीव आणि रिशी सक्सेना यांचा रोमान्स आता पुन्हा पाहायला मिळतोय. लाजीरा हे नवं गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात सायली आणि रिशी एकत्र झळकत आहेत. पुन्हा एकदा या दोघांचा रोमान्स या निमित्ताने पाहायला मिळत आहे. गाण्यातील या जोडीचं लग्न आणि त्यानंतरचं खुलत जाणारं प्रेम यावर हे गाणं चित्रीत केलेलं आहे. गायक केवल वाळंज आणि गायिका स्नेहा महाडीक यांनी हे गाणं गायलय. केवल वाळंज आणि विकास विश्वकर्मा यांनी या गाण्याला संगीत दिलं असून विपुल घांगाळेने हे गाणं लिहीलय. 'रेड बल्ब म्युझिक'ने हे गाणं सादर केलं आहे. 

शिव-गौरीची जोडी  म्हणून प्रसिद्ध असलेल्या सायली आणि रिशी यांचा मोठा चाहतावर्ग आहे. 'काहे दिया परदेस' या मालिकेनंतर त्यांनी केलेल्या कामाला प्रेक्षकांनी पसंत केलं.  या रोमँटिक गाण्यालाही प्रेक्षक पसंत करतील यात शंका नाही. शिव-गौरीच्या जोडीप्रमाणे याही गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळेल यात शंका नाही. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive