By  
on  

फुलपाखरु’ची ५०० भागांपर्यंत झेप, मानस-वैदेहीसह टीमचंं जोरदार सेलिब्रेशन

निरागस प्रेमाचे अनुभूती करून देणारी ‘फुलपाखरू’ या मालिकेने अलीकडेच ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. या मालिकेतील मानस आणि वैदेहीच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेचं कथानकही अनेकांच्या पसंतीस पडलं आहे.

 

या मालिकेने ५०० भाग पूर्ण केल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ सेटवर जंगी सेलिब्रेशन देखील झालं.
यावेळी सेटवर केक कापण्यात आला. यावेळी टीमचे आभार मानले गेले.

या मालिकेत वैदेहीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे म्हणते, ‘ ५०० भागांचा यशस्वी टप्पा गाठणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. फुलपाखरु या मलिकेवर रसिकांनी दाखवलेल्या प्रेमामुळेच इथवर पोहोचणं शक्य झालं आहे. हा क्षण टीमसोबत साजरा करणं माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. या क्षणी मी रसिक प्रेक्षकांचे आभार मानू इच्छिते. त्यांनी भविष्यातही आमच्यावर असंच प्रेम करावं.’
रसिकांच्या प्रेमाने भारावलेला मानस म्हणजेच यशोमन आपटे म्हणतो, ‘ हा टप्पा पार केल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. आमच्यावर प्रेम करणा-या सर्व चाहत्यांचा मी कृतज्ञ आहे. हा प्रवासा सुंदर होता आणि मला आशा आहे की आम्ही असे अनेक टप्पे पार करू.’

Recommended

PeepingMoon Exclusive