By  
on  

'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमध्ये नवं वळण, केतकी चितळेची होणार एन्ट्री

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये अनेक अनिश्चित घटना घडत आहेत. मल्हारच्या आयुष्यातून आर्वीचे अचानक निघून जाणे, तिच्या मृत्यूची बातमी येणे. हे फारच दु:खद होते. लक्ष्मी आणि आर्वी एकमेकांच्या खुप जवळच्या होत्या. लक्ष्मीला अजूनही ताई आता आपल्यात नाही, यावर विश्वास ठेवणं कठीण होऊन बसलं आहे.

अक्काच्या मैत्रिणीची मुलगी अबोली म्हणजेच केतकी चितळे ही लवकरच मल्हारच्या घरात येणार असून, तिच्या येण्याने मालिकेला कोणते नवे वळण मिळणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. तेव्हा पाहत राहा 'लक्ष्मी सदैव मंगलम्' ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive