‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातली ताईत बनली आहे. दररोज ह्या मालिकेत नवं वळण पाहायला मिळतंय. संजना व अनिरुध्दच्या नात्याविषयी समजल्यानंतर खचून न जाता पुन्हा उमेदीने उभं राहण्याचा ठाम निश्चय अरुंधतीने केला आहे. तिच्या ह्या धाडसी निर्णयाला तिच्या जवळच्या माणसांचा ठाम पाठींबा आहे. यात अर्थातच यश, केदार, गौरी आणि विमल हे सर्व आलेच.
अरुंधती रोज मॉर्निंग वॉकला जाते, गाडी शिकायलासुध्दा तिने सुरुवाच केली आहे. तिच्यातला हा बदल आता हळूहळू घरात चांगलाच समजायला लागला आहे. त्यातच अनिरुध्द तिच्यावर कुरघोडी करण्याचा कुठलाच चान्स सोडत नाहीय. अरुंधती वागणं पटत नसल्याने संतापलेल्या आईलासुध्दा यासाठी त्याने हाताशी धरलंय. पण घरातलं रोजचं हे वादाचं वातावरण सुरु असताना आता पुन्हा एकदा देशमुख कुटुंब हादरुन जाणार आहे. तेसुध्दा डोळ्यांदेखल्या पुराव्यासकट.
अनिरुध्द हैद्राबादला ऑफिसच्या कामानिमित्त जातोय, असं घरात सांगून संजनासोबत रिसॉर्टवर एन्जॉय करण्यासाठी गेला आहे. तिथे स्टेजवर चक्क गुडघ्यावर बसून संजनाच्या बोटात अंगठी घालून तो तिच्यासमोर प्रेमाची कबुली देतोय. पण कसं कुणास ठाऊक अरुंधती आणि संपूर्ण देशमुख परिवार त्याक्षणी तिथे येऊन पोहचतं आणि अरुंधती अनिरुध्दसमोर टाळ्या वाजवत त्याला सांगते तुम्हीच तुमच्या तोंडून सर्वांना खरं सांगून टाकलंत. संजना व अनिरुध्दबद्दल इतके दिवस आई-अप्पांना काहीच नाहित नव्हतं, आत्ता ते त्यांनाही कळणार आहे, तेव्हा आता मालिकेत काय घडणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.