By  
on  

पाहा Video : या कारणामुळे बबड्याला आली आईची आठवण

अग्गंबाई सासूबाई मालिकेतील बबड्या आणि आसावरी कायम चर्चेत असतात. या आई-लेकाची जोडी हा सोशल मिडीयावरही चर्चेचा विषय असतो. आई आसावरी किती काही करो बबड्या सुधरण्याचं नाव घेत नाही. आता बबड्या आईपासून दूर राहतोय. अभिजीत-आसावरी घर सोडून गेलेत आणि त्यांचा नवा संसार त्यांनी चाळीत थाटला आहे. यातच आईशिवाय सोहमचं पान हलत नाही. म्हणूनच सध्या आईशिवाय त्याची चिड चिड होत आहे.

 

सोहमला चिडलेलं पाहुन शुभ्रा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. सोहमची चिडचिड शांत करण्यासाठी शुभ्रा त्याला तेल मालीश करून देते. मात्र शुभ्रा मालीश करत असताना सोहमला अचानक आईची आठवण येते. आई किती लाडाने त्याच्या बबड्याची तेल मालीश करत असे हे त्याला आठवतं आणि तो भावुक होतो. मात्र यानंतर तरी सोहमला त्याची चूक लक्षात येईल का. सोहम बदलेल का ? आणि त्याला आईची माया कळेल का हे आगामी भागांतून समोर येईलच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive