आदित्य मेघनासोबतच्या लग्नाची बोलणी करायला दापोलीला आला आणि इथे प्रेमाची जाणीव झालेली सई कुठलाच विचार न करता थेट दापोली गाठते. इथेही आदित्य आणि सईमध्ये बरेच खटके उडतात. सी प्रेमाची कबुली आदित्यकडे देते, पण दादा मामाच्या मनाप्रमाणेच आदित्यला लग्न करायचं असल्याने आदित्य सईला नाही नाही ते बोलून दुखावतोच.
जेव्हा आदित्य सईला सांगतो, “नाहीय माझं तुझ्यावर प्रेम. तुझा वेडेपणाला गोड काय म्हटलं. तु वेड्यांचा बाजारच भरवलास” आदित्यवर जीवापाड प्रेम करणा-या सईच्या पायाखालची जमिन सरकते.
आता कोलमडून गेलेली सई मुंबईला एकटीच परतणार का, आदित्य-मेघनाचं लग्न होणार का? की आदित्य पुन्हा सईकडे परतणार हे जाणून घेण्यासाठी माझा होशील ना मालिकेचे पुढील भाग तुम्ही पाहणं औत्सुक्याचं ठरेल.