By  
on  

पाहा Video : राणादाने दिला या आठवणीला उजाळा, 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचे शेवटचे पाच दिवस

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. यात या मालिकेतील कलाकारांच्या भावुक पोस्ट पाहायला मिळत आहेत. चार वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यासोबतच या मालिकेतील कलाकारांचही एक जणू ऑफस्क्रिन कुटुंबचं तयार झालं होतं. 

या मालिकेत एखादा ट्विस्ट आला की त्याची चर्चा होत असे. कधी राणादाचा मृत्यू असेल किंवा राजा राजगोंडाची एन्डी. या मालिकेतील नवा ट्रॅक कायम चर्चेत राहिला. यातच या मालिकेचा स्पेशल एपिसोडही चर्चेत राहिला होता जेव्हा खऱ्या स्टेडीयममध्ये महाराष्ट्रातल्या दिग्गज कुस्तीपटूंसमोर राणाची खरी कुस्ती दाखवण्यात आली होती. याच भागाची आठवण राणादा साकारणारा अभिनेता हार्दिक जोशीने करुन दिली आहे.

 

हार्दिक त्याच्या सोशल मिडीया पोस्टमध्ये लिहीतो की, "तुझ्यात जीव रंगलाचे शेवटचे पाच दिवस! आणि आमच्या प्रवासातल्या सगळ्यात भव्य एपिसोडची ही आठवण! प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या खऱ्या स्टेडीयममधे, महाराष्ट्रातल्या दिग्गज कुस्तीपटूंसमोर राणाची खरी कुस्ती! वज्रकेसरी! असा एपिसोड पुन्हा होणं खूप कठीण आहे! अनेकांच्या मेहनतीमुळे आणि इच्छाशक्तीमुळे हे शिवधनुष्य उचलता आलं होतं! ह्या भागानेच नारा मिळाला,”शपथ हाय मातीची, एकमेकांच्या साथीची"

तेव्हा मालिकेचे काहीच भाग आता प्रेक्षकांना पाहायला मिळतील आणि त्यानंतर या मालिकेचा शेवट होणार आहे. या मालिकेमुळे राणादाची भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशीचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. हे चाहते राणादाला मिस करतील यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive