By  
on  

स्टार प्रवाहवरील ‘जीवलगा’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

स्टार प्रवाहवरील ‘जीवलगा’ मालिकेने अल्पावधीतच रसिकांना आपलसं केलं आहे. या मालिकेतील विधी, निखिल, काव्या, विश्वास या पात्रांना विशेष प्रसिद्धी मिळाली. विवाहबाह्य संबंधावर आधारित असलेल्या या मालिकेत काव्या आणि निखिल यांची केमिस्ट्रीही रसिकांना आवडली होती.

 

पण काव्या साकारणा-या अमृताने काही दिवसांपूर्वीच मालिकेचा निरोप घेतला होता. आता सिद्धार्थ आणि स्वप्नीलनेही एक पोस्ट शेअर करत या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शुटिंग पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे. सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या पोस्टमध्ये मालिकेचे टायटल साँग शेअर केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

विश्वास वर विश्वास ठेवून, त्याच्यावर मनापासून प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग हा माझा खरा जिवलगा... विश्वास देशपांडे याने मला काय दिले तर, माझ्या या अभिनयाच्या प्रवासात आणखी एक नवी ओळख... शब्दात अडकवणाऱ्या विश्वासाच्या प्रेमात मी पडलो, एखाद्या परिस्थिती वर काव्यात्मक पध्दतीने कसं रिअॅक्ट करू शकतो हे त्याच्यामुळे जाणवले... जिच्या डोळ्यात विश्वास ला शब्द दिसू आणि सुचू लागले अशी काव्या म्हणजेच अमृतासोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करायला मजा आली... सिद्धार्थ आणि मधुरा सोबत screen share करण्याचा अनुभवही खूप मजेशीर होता. सर्वांत मोठे कौतुक आणि धन्यवाद #satishrajwade & #irisproduction चे ज्यांनी पावलो पावली साथ दिली. ज्याने विश्वासला बनवला आणि प्रेक्षकांनसमोर सुंदर रित्या पोहोचवले त्या जिवलगाच्या टीम चे आणि @star_pravah चे धन्यवाद एखाद्या पुस्तकात जशा सुंदर शब्दांनी जागा करावी आणि ते पुस्तक नेहमी स्वतः शी बिलगून ठेवावे असाच माझ्या आयुष्यातील सुंदर अनुभव म्हणजे जिवलगा! #jeevlaga #swapniljoshi #vishwas #starpravah

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi) on

तर स्वप्नीलने टीमसोबत शुटिंगच्या दिवसाचा फोटो शेअर केला आहे. ‘जीवलगा’ मालिकेच्या प्रेक्षकांसाठी ही मात्र फारशी आनंददायक बातमी नाहीये. या मालिकेच्या जागी आता कोणती मालिका येईल याची उत्सुकताही रसिकांना आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive