By  
on  

इरफान खानच्या आठवणीत दिग्दर्शक समीर विद्वांस म्हणतात "तो टिव्हीवर दिसला की डोळे भरून येतात"

"सिर्फ इन्सान गलत नही होते, वक्त भी गलत हो सकता है..." असे अनेक डॉयलॉग त्याच्या अनोख्या संवाद कौशल्याने त्यांनी खास बनवलेत. मात्र आता हेच संवाद, त्यांचे सिनेमे आणि आठवणी देऊन गेलेत अभिनेता इऱफान खान. या हरहुन्नरी कलाकाराने वर्षी जगाचा निरोप घेतला. कर्करोगाशी झुंज देत इरफान यांनी अलविदा म्हणलं. त्याच्या जाण्यानं सिनेविश्वासह त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती. आज इरफान यांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालय, पण आजही अनेक जण या दु:खातून सावरले नाहीत. 

आजही इरफानच्या आठवणींनी अनेकांना अश्रू अनावर होतात. सोशल मिडीयावर अनेकांनी आज इरफान यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस हे देखील इरफानचे मोठे चाहते आहेत. मागील वर्षी इरफानच्या निधनानंतर त्यांनी एक पोस्ट सोशल मिडीयावर शेयर केली होती. पुन्हा एकदा एक वर्षांनी या पोस्टसह त्यांंनी इरफानची आठवण काढलीय. 

 

समीर लिहीतात की, "इरफानला जाऊन आज एक वर्ष झालं. तो गेला त्यानंतर हे लिहिलं होतं. आजही तसंच वाटतं! अजूनही कधी तो टिव्हीवर दिसला की डोळे भरून येतात! अजूनही! तुझी आठवण येतेय इरफान."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive