By  
on  

Exclusive- देसी गर्लने सलमानचा ‘भारत’ सोडण्याचे खरे कारण झाले उघड

प्रियंका चोप्राने सलमान खानच्या ‘भारत’ सिनेमाला सोडचिठ्ठी दिल्याचं खरं कारण आता सर्वांसमोर उघड झालं आहे. अली अब्बास जफरच्या सिनेमा सोडल्याचं कारण प्रियंका आणि तिचा अमेरिकन संगीतकार बॉयफ्रेंड निक जोनस यांचा साखरपुडा असे बोलले जात होते, पण हे कारण नसून ता एक वेगळेच कारण समोर आले आहे. पिपींगमून मराठीवर हा एक्सक्लुझिव्ह खुलासा आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत.

पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंकाने हॉलिवूड सिनेमासाठी ‘भारत’ सोडल्याचे खरे कारण, समोर आले आहे. ते म्हणजे देसी गर्लला हॉलिवूडमध्ये एक मोठा सिनेमा ऑफर करण्यात आला आहे. यात तिचा ड्रीम रोल असल्याचीसुध्दा माहिती मिळाली आहे.

हॉलिवूड वेब सिरीज ‘क्वांटिको’मधून प्रियंकाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. मागीलवर्षी प्रदर्शित झालेला, तिचा सिनेमा ‘बेवॉचला’ म्हणावं तसं यश मिळालं नाही.भारत सिनेमात प्रियंका सलमानच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार होती आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ती शुटींगही पूर्ण करणार होती. पण अचानक प्रियंकाने यातून माघार घेतली.

दरम्यान ‘भारत’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या सिनेमात प्रियंका भूमिका साकारणार नाही, याचे खास कारण ,प्रियंका व निकची वाढती जवळीक. हेच तिचं सिनेमा सोडण्याचं कारण असल्याचं त्यांनीच एका ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केलं होतं, त्यामुळे याबाबत कोणालाच काही तक्रार नव्हती. परंतु आता प्रियंकाचं सिनेमा सोडण्याचं खरं कारण समोर आल्यावर सर्वत्र उलट-सुलट चर्चेला उधाण येणार आहे, हे नक्की.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive