By  
on  

पाहा Video : यामुळे पुन्हा एकत्र दिसले राणादा आणि पाठक बाई, हे आहे खास कारण...

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून राणादा आणि पाठक बाई म्हणजेच अंजली ही जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेचा वेगळा विषय, कलाकार, शीर्षकगीत या सगळ्याच गोष्टी लक्षवेधी ठरल्या होत्या. या मालिकेने प्रेक्षकांचं निरोप घेऊन बराच कालावधी झाला असला तरी मालिकेतील राणादा आणि अंजली बाईंची लोकप्रियता कायम आहे.

अभिनेता हार्दिक जोशीने साकारलेला राणादा आणि अभिनेत्री अक्षया देवधरने साकारलेली अंजली प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. हीच जोडी आता पुन्हा एकदा एकत्र दिसतेय. निमित्त आहे एका जाहीरातीचं. एका जाहीरातीच्या फोटोशुट निमित्ताने हार्दिक आणि अक्षयाने एकत्र फोटोशूट केलय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

खास ग्रँड वेडिंग पेहरावात हे फोटोशुट करण्यात आलय. यात दोघांचीही जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळतेय. शिवाय या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहुन चाहत्यांना प्रचंड आनंद झालेला दिसतोय.म्हणूनच या व्हिडीओला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसतेय.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून प्रसिद्ध झालेली ही जोडी पुन्हा एकत्र पाहणं चाहत्यांसाठी पर्वणी असते. त्यामुळे हार्दिक आणि अक्षयाला एकत्र पाहुन चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

Author

Recommended

PeepingMoon Exclusive