By  
on  

वीणा आणि शिवानीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी कोण आहे यांच्यातील कळीचा नारद

अनेक लोकं एकत्र आले कि भांड्याला भांड लागणारच, शब्दाला शब्द लागणारच, आणि गैरसमज होणारच. बिग बॉसचं घर म्हंटल कि, हे स्वाभाविकच आहे. कारण वेगवेगळ्या क्षेत्रातील १५ कलाकार एकत्र आले म्हणजे एकमेकांचा स्वभाव समजण, त्यांच्या सवयी कळण याला वेळ लागतोच... मराठी टेलिव्हिजनवरील दोन लोकप्रिय अभिनेत्री राधा म्हणजेच विणा जगताप आणि शिवानी सुर्वे यांचं घरामध्ये तसं चागलं जमत होत. पण आता या दोघींमध्ये वाद होताना दिसणार आहे. हा वाद देखील अभिजित बिचुकले यांच्यावरूनच आहे . “मला नको सांगूस कसं बोलायचं” असं शिवानीच म्हणणे आहे तर विणाचा मुद्दा आहे किचन मध्ये आरडाओरडा नको. आता नक्की काय झालं ? वाद मिटणार का ? हे आजच्या भागामध्ये कळेलच...

https://www.instagram.com/p/ByFHFMngKHi/?utm_source=ig_web_copy_link

बिग बॉस मराठी सिझन २ सुरु झाल्यापासून अभिजित बिचुकले हे नाव चर्चेत आहे ... पण अभिजित केळकर याच्याशी बोलताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी का आले ? त्यांनी कोणत्या गोष्टी सांगितल्या या दरम्यान सांगितल्या ? हे आजच्या भागामध्ये कळेलच ... दिगंबर नाईक यांनी सुंदर कविता सादर केली... “रत्नागिरी,देवगड, कणकवली कट्टा, मालवण, राजापूर आणि आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येई उर” अशा शब्दांत त्यांनी गाण्याची सुरुवात केली आणि याचबरोबर कोकणचे कौतुक आणि वर्णन त्यांनी खूप सुंदररीत्या शब्दांत केलं. याचबरोबर त्यांनी गाऱ्हांण देखील सादर केले ज्याला घरातील बाकीच्या सदस्यांनी देखील साथ दिली.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive