By  
on  

‘जागो मोहन प्यारे’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

एका चाळीत राहणा-या सामान्य-कष्टकरी माणसाच्या आयुष्यात अचानक एक परी येते. तिसुध्दा सामान्य स्त्रीचं रुप घेऊन त्याच्या अवतीभोवती वावरते आणि त्याच्या प्रत्येक अडचणीच्या प्रसंगातून त्याला आपल्या जादूने अलगद बाहेर काढते. अशा स्वप्नवत  कथानकावर बेतलेली ‘जागो मोहन प्यारे’ ही झी मराठीवरील मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांना प्रचंड भावली. पण आता या मालिकेने दीड वर्षांच्या प्रवासानंतर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

मोहनच्या भूमिकेत अतुल परचुरे आणि त्याचं आयुष्य सुखद करण्यासाठी आलेली परी म्हणजे मोहिनी उर्फ भानू म्हणजेच श्रृती मराठे ह्यांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. या प्रमुख पात्रांसह या मालिकेतील चाळीतील रहिवाशी साकारणा-या विविध व्यक्तिरेखासुध्दा तितक्याच लोकप्रिय ठरल्या.

https://www.instagram.com/p/Bp3ULFfFY7s/

‘जागो मोहन प्यारे’ मालिकेचा 10 नोव्हेंबरला अखेरचा एपिसोड प्रसारित झाला आणि संपूर्ण मालिकेची टीम भावूक झाली. प्रेक्षकाचं हलकं-फुलकं मनोरंजन करणा-या या मालिकेला नक्कीच मिस करतील!

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive