By  
on  

अभिनेत्री पल्लवी सुभाषची रंगभूमीवर 'खळी'

अनेक हिंदी-मराठी मालिका आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी चतुरस्त्र अभिनेत्री पल्लवी सुभाष लवकरच रंगभूमीवर अवतरणार आहे. यापूर्वी नाटकांपासून दूर राहिलेली पल्लवी आत्ता एक नवं कोरं नाटक घेऊन येतेय. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

‘नाट्यमंदार’ आणि ‘विप्रा क्रिएशन्स’ या दोन संस्थांची निर्मिती असलेल्या ‘खळी’ या नव्या नाटकात पल्लवी प्रमुख भूमिका साकारत आहे.  या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन ही जबाबदारी शिरीष लाटकर यांनी सांभाळली आहे. पल्लवी सुभाष सोबत संदेश जाधव व नेहा अष्टपुत्रे यांच्या या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पल्लवी सुभाष या नाटकाबद्दल बोलताना म्हणाली, "या नाटकाची कथा मला फार भावली असल्याने मी हे नाटक करण्यास आनंद वाटतोय.  या नाटकातली ‘उपासना’ थोडीफार माझ्यासारखीच आहे. त्यामुळे ही भूमिका करताना मला छान वाटत आहे."

१५ डिसेंबर रोजी ‘खळी’ या नाटकाचा शुभारंभ मुंबईतील दीनानाथ नाट्यगृहात होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive