By  
on  

अपूर्वा-विजयचं शुभमंगल, 'जुळता जुळता जुळतंय की'

प्रेमामध्ये कोणत्याही गोष्टीत फरक पाडला जात नाही, जे आहे ते आपुलकीने, प्रेमाने स्विकारणे म्हणजे प्रेम. उंची, रुप, दिसणे, आर्थिक-सामाजिक परिस्थिती याला जास्त मोल न देता प्रेमाला महत्त्व देणे महत्त्वाचे असते आणि हे सिध्द केलंय सोनी मराठीवरील प्रेमळ जोडी ‘अपूर्वा आणि विजय’यांनी. मेमरी कार्ड रिकव्हरीच्या निमित्ताने अपूर्वाचं विजयच्या मल्टीपर्पज दुकानात येणं हे विधिलिखितच होतं. कारण अचानकपणे झालेल्या भेटीचं भविष्यात काहीतरी वेगळंच प्लॅनिग तयार झालेलं असतं. अनेक अडचणींना धैर्याने सामोरे गेल्यावर ‘जुळता जुळता जुळतंय की’ मालिकेत अपूर्वा आणि विजयच्या आयुष्यात आनंदी प्रसंग घडणार आहे.

कोल्हापूरमधील रंकाळा येथे एकदम हटके म्हणजे इतर मुलं गुलाब किंवा महागडं गिफ्ट देऊन प्रपोज करतात पण विजयने मात्र अपूर्वाला ऐतिहासिक वारसा असलेल्या ऱंकाळाच्या मधोमध जाऊन जिलेबी स्टाईलने लग्नाची मागणी घातली होती आणि अपूर्वाने ती मागणी अगदीच भाऊक होऊन स्विकारली आणि विजय अपूर्वानी आपल्या घरी सगळ्यांना ही गोड बातमी देऊन त्यांची परवानगी अखेर घेतली. या गोड प्रसंगानंतर ‘जुळता जुळता जुळतंय की’मध्ये होणार अपूर्वा आणि विजयचं शुभमंगल! ‘लग्न’ ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकजण याबाबतीत उत्सुक असतो, नवीन जबाबदा-या तितक्याच ताकदीने पेलण्यासाठी स्वत:ला समर्थ करत असतो आणि त्याच्याच सोबतीला आपसूकपणे प्रेम हे दिवसेंदिवस वाढत जाते. आणि कोणतेही नातं टिकवण्यासाठी अन् ते फुलवण्यासाठी प्रेमाची वाढ होणे आवश्यक असते आणि प्रेमात एकमेकांना एकमेकांची साथ असली कोणतीही गोष्ट शक्य होते. असेच अपूर्वा आणि विजय यांचे प्रेम, तसेच प्रेमाच्या सुरुवातीला छोट्या-मोठ्या संकेतातून व्यक्त केलेल्या भावना सर्व काही आता जिंकलंय आणि त्यांचा लग्नाचा योग आता जुळून आलाय.

कोल्हापूरमधील लोकांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या आशिर्वादाने अपूर्वा आणि विजय यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आणि विशेष म्हणजे नवरी मुलीच्या व-हाडीत कोल्हापूरमधील मंडळी सामिल असणार आहे. यावरुन हे स्पष्ट होते की या संपूर्ण सोहळ्यात अपूर्वा एकटी पडणार नसून तिच्या सोबतीला रक्ताच्या नात्याच्या पलीकडची लोकं या प्रवासात तिच्या सोबत असणार आहेत. मुलीची बाजू खंबीर असणं खूप गरजेचं असतं आणि कोल्हापूरकरांनी अगदी योग्य असा निर्णय घेऊन नवरी मुलीच्या बाजून लग्नात सामील होण्याचे ठरवले.

मुलीसाठी आणि तिच्या पालकांसाठी लग्नसोहळ्यातील सर्वात जास्त भावनिक गोष्ट म्हणजे ‘कन्यादान’. कन्यादान करताना पालकांना अश्रु आवरत नाही, ज्या मुलीचा तिच्या लहानपणापासून सांभाळ केला, प्रेमाने-लाडाने वाढवले, तिचे कन्यादान करणे हे कोणत्याही आई-वडीलाला भावूक करते. पण या मालिकेत कन्यादानासारखीच आणखी एक भावूक करणारी गोष्ट म्हणजे अपूर्वाच्या घरातून भाऊ सोडला तर कोणीही या लग्नात उपस्थित नाही.

नाही, त्यामुळे आपले कन्यादान कोण करणार हा प्रश्न अपूर्वाला सतत सतावत असतो. पण अपूर्वाने तिच्या स्वभावातून विजयच्या घरातील माणसांची मने जिंकली आहेत आणि म्हणूनच विजयचे आजोबा ‘नाना’ अपूर्वाचे कन्यादान करणार आहेत. मुलाकडच्या मंडळीतून कोणी एका व्यक्तीने कन्यादानासाठी पुढाकार घेणे आणि कन्यादानासारखी मोठी जबाबदारी आपलेपणाने पार पाडणे हा एक महत्त्वाचा विचार समाजात पोहचवण्याचे उत्तम कार्य सोनी मराठी आणि या मालिकेने केले आहे. त्यातबरोबर या लग्नाप्रसंगी विजय प्रथेप्रमाणे मुलीनेच का वचन द्यायचं असं म्हणून तो पण सात वचनांपैकी काही वचन देणार आहे. ते कुठले वचन असणार हे पाहणयासाठी बघा लग्नाचा विशेष भाग २६ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता फक्त सोनी मराठीवर.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive