‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं शुटिंग लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्राबाहेर होत होतं. पण नुकतीच ही सगळी टीम परतली आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊनची स्थिती शुटिंगसाठी अनुकुल झाल्यावर ही टीम मुंबईमध्ये परतली आहे. त्यामुळे जवळपास 2 महिन्यांनी शालिनी वहिनी म्हणजे माधवी निमकरने या संदर्भातील व्हिडियो शेअर केला आहे.
यामध्ये शालिनीने सध्या डबिंगसाठी सेटवर आल्याचं शेअर केलं आहे. माधवीने नुकतीच कोविड प्रतिबंधक लसही घेतली आहे. यावेळी शालिनीसोबत व्हिडियोमध्ये मल्हारही दिसत आहे. यावेळी शालिनी तिच्या नव्या मेक अप रुमबाबत उत्सुक असल्याचंही दिसून येत आहे.