By  
on  

पोलिसांनी केली राखीची सुटका, लगेच शेयर केली पोस्ट

राखी सावंत ह्या बॉलिवूडच्या ड्रामा क्वीनला काल अटक झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. 19 जानेवारी रोजी आंबोली पोलिसांनी राखीला एका ्परकरणात अटक केली होती. मॉडेल व अभिनेत्री शर्लिन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली. दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री राखीची पोलिसांकडून सुटका करण्यात आली.

पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. पाणावलेल्या डोळ्यांचा फोटो राखीने पोस्ट केला आहे. “जगातील सगळ्यात महागडं द्रव्य म्हणजे अश्रू. अश्रूंमध्ये १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावना असतात. कोणालाही दुखवण्याच्या आधी दोनदा विचार करा”, असं राखीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. राखीची ही पोस्ट सध्या र्चेत आहे.

तसंच राखीने प्रसिध्दी माध्यमांनासुध्दा प्रतिक्रीया दिली. जय महाराष्ट्र, जय भारत मला डॉक्टरांचा फोन आला माझ्या आईची तब्येत ठीक नाहीय. तिला भेटायला मी रुग्णालयात जातेय. मला चक्कर येतेय, माझं बीपी लो होतंय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive