By  
on  

पाहा Video : 'चंद्र आहे साक्षिला' मालिकेत स्वाती घेणार श्रीधरपासून दूर जाण्याचा निर्णय ?

'चंद्र आहे साक्षिला' ही मालिका आता विविध ट्विस्ट घेऊन प्रेक्षकांच्या समोर येत आहे. सुरुवातीपासून ही मालिका प्रेक्षकांना एका वेगळ्या वळणावर घेऊन गेली आहे. मालिकेतील गुढ प्रेक्षकांचं लक्ष वेधताना दिसत आहे.

स्वाती आणि श्रीधरची भेट त्यानंतर दोघांची जवळीक पाहायला मिळाली. मात्र नवनाथने सांगीतलेल्या गोष्टी आणि मनोहरने केलेले आरोप न जुमानता स्वाती श्रीधरच्या जाळ्यात फसताना दिसत होती. मात्र अचानक स्वातीने तिचा निर्णय बदललेला पाहायला मिळतोय.

एकीकडे स्वाती आणि श्रीधरची जवळीक वाढत असताना स्वातीने या नात्यात थांबण्याचा निर्णय घेतला आहे. तिचा हा निर्णय पक्का झाला असून हा निर्णय तिने श्रीधरला कळवलय. हे ऐकून श्रीधरला मात्र धक्का बसतो. एकीकडे कटकारस्थानं रचणारा श्रीधर आणि त्याच्या जाळ्यात अडकत जाणारी स्वाती यांची प्रेमकहाणी आता सुरु होण्यापूर्वीच संपली की काय असं चित्र पाहायला मिळतय. हे नुकत्याच प्रदर्शित केलेल्या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतय.

 

मात्र स्वाती हा निर्णय का घेते आणि हा तिचा पक्का निर्णय असेल का हे लवकरच पाहायला मिळेल. तेव्हा श्रीधर आणि स्वातीत फुलणारं नातं अर्ध्यावरच संपणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून समोर येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive