By  
on  

अज्या-शितलीच्या 'लागिरं झालं जी' मालिकेचा 500 भागांचा आनंदोत्सव

झी मराठीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका लागिरं झालं जीने 500 भागांचा टप्पा ओलांडत प्रेक्षकांच्या मनात मानाचं स्थान पटकावलं आहे. अज्या आणि शितलीची आर्मीची नोकरी व संसार यावर सुरु असलेली कसरत पाहणं सर्वांच्याच पसंतीस उतरतेय. फक्त हे दोघं नायक-नायिकाच वनाही तर या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांनी आपलंस केलं आहे. म्हणूनच 500 भागांचा आपल्या टीमचं यश या सर्व कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञान मंडळींनी एकत्र येत जल्लोषात साजरं केलं.

500 भाग पूर्ण केल्याचा आनंद व्यक्त करताना शीतल म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर सोशल अकाऊंटवर  म्हणते, "मी सर्वप्रथम माझ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करू इच्छिते. प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असंच राहू दे. मला या मालिकेचा एक महत्वाचा हिस्सा बनवल्याबद्दल मी माझ्या संपूर्ण 'लागीर झालं जी'च्या टीमची आभारी आहे."

https://www.instagram.com/p/BrJ4QZ8AkqP/

 

'लागिरं झालं जी' मालिकेच्या निमित्ताने एका देशसेवेसाठी वाहून घेतलेल्या सैनिकाचं आयुष्य आणि त्याच्या कुटुंबियांना करावी लागणारी तडजोड अनुभवायला मिळते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive