By  
on  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले कायदे लागू करा : शरद पोंक्षे

सध्या सर्वत्र महिला अत्याचाराच्या घटनांनी देश हादरला आहे. "आज कठोर कायदे करण्याची गरज आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना ऐकून संताप होतो.चीड येते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. महाराजांच्या काळात जे कायदे होते ते आता लागू करण्याची खरी गरज" असल्याचं अभिनेते शरद पोंक्षे पुण्यातील एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

 “हैदराबाद पोलिसांनी जे केलं ते उत्तम केलं" असंही शरद पोंक्षे हैद्रबाद पोलिसांचं कौतुक करताना म्हणाले. तर एखाद्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहणा-याला प्रथम कठोर शिक्षेचा विचार यायला हवा आणि त्या दहशतीमुऴे गुन्हा करण्याचं धाडसच त्याला होऊ नये,  तेव्हाच या घटनांना आळा बसेल, असेही शरद पोंक्षे हिंगणघाट घटनेवरचा संताप व्यक्त करताना म्हणाले. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive