झी युवावरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली 'बापमाणूस' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. रविंद्र मंकणी, सुयश टिळक, पल्लवी पाटील आदि कलाकारांच्या सशक्त अभिनयाने सजलेली या कौटुंबिक मालिकेने २५० एपिसोड्सचा पल्ला गाठला. कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवरील कथानक असलेली ही मालिका शेवट पर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवील. मालिकेचा संपूर्ण प्रवास या टीमसाठी अविस्मरणीय होता.
या प्रवासाबद्दल बोलताना मालिकेचे दिग्दर्शक हर्षद परांजपे म्हणाले, "बघता बघता वेळ कसा निघून गेला आणि या मालिकेचा शेवटापर्यंत कधी पोहोचलो ते कळलंच नाही. हा प्रवास अत्यंत रंजक होता. सगळ्यांनी एकत्र एकजुटीने काम करून ही मालिका आणि मालिकेचा प्रवास यशस्वी बनवला. सेटवरती आमचं एक कुटुंबच तयार झालं. आता लवकरच या मालिकेचा शेवट प्रेक्षक पाहू शकतील. इथंवरच्या या यशस्वी प्रवासाचं श्रेय मी माझ्या संपूर्ण टीमला देतो. सगळ्यांच्या अथक परिश्रमाने आणि मेहनतीनेमुळे ही मालिका आम्ही प्रेक्षकांसाठी रंजक बनवू शकलो."
https://www.instagram.com/p/BgxkIe4gnDW/?taken-by=baapmanus
'बापमाणूस' मालिकेचा एक गोड शेवट पाहायला विसरू नका १७ नव्हेंबर रात्री ८.३० वाजता फक्त आपल्या झी युवा वर!!!