By  
on  

तब्बल 12 वर्षांनंतर अप्सरा सोनाली कुलकर्णीसोबत घडली ही गोष्ट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने 2007 मध्ये सिनेविश्वात 'बकुळा नामदेव घोटाळे' या सिनेमातून पदार्पण केलं होतं. याच सिनेमासाठी सोनालीला 2008मध्ये झी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 

मात्र तब्बल 12 वर्षांनंतर ही गोष्टी पुन्हा सोनालीसोबत घडली आहे. सोनालीचा हिरकणी हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला. सोनालीच्या कामाचही प्रचंड कौतुक झालं. आणि याच कामाची पोचपावती म्हणून सोनालीला नुकतच झी गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. 

 

मात्र ही ट्रॉफी सोनालीच्या हातात तब्बल 12 वर्षांनंतर आली आहे. याविषयी स्वत: सोनालीने सोशल मिडीयावर पोस्ट करून सांगीतलं आहे. सोनाली लिहीते की, "तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा झी गौरव पुरस्कार...
बाप्पाची कृपा,आणि शिवरायांचे आशिर्वाद...हा पुरस्कार तमाम "हिरकण्यां"ना समर्पित."

ही पोस्ट करून ही ट्रॉफी पुन्हा मिळवल्याचा आनंद सोनालीने व्यक्त केला आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive