By  
on  

या कलाकारांनी गुपचुप केलं लग्न ? म्हणतायत "आम्ही पळून जाऊन लग्न केलंय"

एखादी मालिका, नाटक, चित्रपटासाठी विविध प्रकारे प्रमोशन केलं जातं. कधी सोशल मिडीयावर विचित्र पोस्ट करून आगामी प्रोजेक्टविषयी सांगितलं जातं. अभिनेता नितीश चव्हाणची पोस्टही असच काहीसं सांगत असल्याचं पाहायला मिळतय. नितीशने हातात कागद घेऊन काढलेला एक फोटो शेयर केलाय. त्या कागदावर लिहीलय की "आम्ही पळून जाऊन लग्न केलंय... आमच्या जीवाला धोकाय." आता अशाप्रकारची पोस्ट पाहिल्यावर अनेकांना धक्का बसलाय. काहींनी ही नव्या प्रोजेक्टसाठीही प्रमोशनल युक्ती असल्याचही कमेंट केलय.

 

नितीशने या पोस्टमध्ये लिहीलय की, "मी आत्तापर्यंत सोशल मेडियावर माझ्या रिलेशन बद्दल सांगितलं नाही कारण घरच्यांचा विरोध होता आणि अजूनही आहे त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. कालच आम्ही पळून जाऊन लग्न केलंय,मला खरतरं हे असं सगळ्यांनसमोर सांगायचं न्हवत पण कालपासून तिच्या घरून मला वारंवार धमक्या येत आहेत म्हणून हे सांगावं लागतंय" 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ओ (@manasibhawalkar)

 

फक्त नितीशच नाही तर अभिनेत्री मानसी भवाळकरनेही अशीच एक पोस्ट केलीय. ज्यात तिने लिहीलय की, "आम्ही पळून लग्न केलय... घरचांचा विरोध असल्यामुळे आम्हाला हे पाउल उचलायला लागलं. आम्हाला तुमचा मदतीची गरज आहे!!"

आता दोन कलाकारांनी केलेल्या या पोस्टमुळे एखाद्या प्रोजेक्टसाठी अशा पद्धतिची पोस्ट असल्याचं म्हटलं जातय. एवढच नाही तर आगामी सोयरीक चित्रपटासाठीचा हा प्रमोशनल फंडा असल्याचही बोललं जातय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive