मनोरंजन क्षेत्रात कोण कधी स्टार बनेल सांगता येत नाही. पण असं म्हणतात ना की काही मेहनतीने तर काही वेगळ्या मार्गांनी पुढे जातात. अशी प्रचीती अनेक कलाकारांना या कलाविश्वात येत असते. कास्टिंग काऊच सारखे प्रकरणही या क्षेत्रात पाहायला मिळतात. यातच एका मराठी अभिनेत्रीने या इंडस्ट्रीचं वास्तव समोर आणलय.
अभिनेत्री मीनल बाळने नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. मीनलची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे. मीनलने आत्तापर्यंत विविध मालिका, चित्रपटांमध्ये काम केलय. मीनलने तिच्या पोस्टद्वारे एक धक्कादायक अनुभव शेयर केलाय. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "प्रामाणिक पणे खूप मनापासून सिंसीयरली काम करणं, विचार करून चांगलं काम करण्याची धडपड,संयम,श्रध्दा, मेहनतीचं फळ वगैरे सब झूट है!!! कोणाच्या तरी मागे मागे करा, करेक्ट लोकांच्या संपर्कात रहा,एखाद्या ग्रूपशी संलग्न रहा,खूप गोड (खोटं खोटं) वागा आणि बास झालं काम .मग काय कामा वर काम मिळत राहणार आणि मग वर वर काम केलं तरीही किंवा काम येत नसेल तरीही फरक पडणार नाही . तुमच्या डोक्यावर क्राऊन हा असणारच आणि मग त्याचाच रुबाब (attitude) करायचा.आहे की नाही वर जाण्याचा म्हणजे प्रसिद्ध होण्याचा मार्ग.शू.....कोणाला सांगू नका हा , हा मार्ग मी तुम्हाला सांगितला ते... आपलं सिक्रेट. रामचंद्र कह गए सिया से, ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना तुन का, कौआ मोती खाएगा. ता. क.- वरील मजकूर हा कोणालाही म्हणजे कोणालाही उद्देशून नाही किंवा सर्वांनाच लागू होत नाही,किंवा मला आक्षेप नाही."
अशी पोस्ट करत तिने वास्तव समोर आणलय. मात्र हे कुणाला उद्देशून नसल्याचही म्हटलय.
मीनलने 'भेटली तू पुन्हा', 'इरादा पक्का' या चित्रपटात काम केलय. तसेच 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतही तिने लाडी ही भूमिका साकारली होती.