भारतीय महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी, यशासाठी करवाचौथ व्रत करतात. बॉलिवूडमधील अभिनेत्रीही आपल्या पतीच्या दिर्घायुची कामना करत करवाचौथचं व्रत करतात. पण यावेळी अभिनेता अभिषेक बच्चननेही पत्नी ऐश्वर्यासाठी करवाचौथचं व्रत केलं होतं.
लुडोसाठी दिलेल्या प्रमोशन इंटरव्ह्युमध्ये त्याने ही बाब स्पष्ट केली आहे. तो म्हणतो, ‘ करवाचौथचा दिवस दोघांसाठी कामाचा होता. यावेळी हे सेलिब्रेशन एका फॅमिली अफेअरसारखं होतं. संध्याकाळी स्त्रियांनी पुजा केली. चंद्राची वाट पाहून उपवास सोडला. एक उत्तम कौटुंबिक सोहळा होता. लुडोमधील अभिषेकची को-स्टार इनायत वर्मा म्हणते, ‘अभिषेक भैय्याने मला सांगितलं की, त्यांनी उपवास ठेवला आहे. पण ते सरगी करायच विसूरून गेले होते. त्यामुळे त्यांनी काहीही खाल्लं नाही.’