दिग्दर्शक समीर विद्वांस आता बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत. समीर विद्वांस यांच्या पहिल्या वहिल्या हिंदी सिनेमाचं नाव 'सत्यनारायण की कथा' असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. अभिनेता कार्तिक आर्यन या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
— Sameer Vidwans । समीर विद्वांस (@sameervidwans) July 3, 2021
पण आता समीर यांनी हटके निर्णय घेतला आहे. समीर विद्वांस यांनी ट्वीट करत ‘सत्यनारायण की कथा’ या सिनेमाचं नाव बदलणार असल्याचे सांगितले आहे. “कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून आम्ही आगामी सिनेमा ‘सत्यनारायण की कथा’ चं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेमाच्या नावामुळे कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. निर्मात्यांनी आणि क्रिएटीव्ह टीमने यासाठी पाठींबा दिला आहे. सिनेमाच्या नव्या नवाची घोषणा लवकरच करु.’ असं ट्वीट समीरने केलं आहे.