अक्षय कुमार सध्या रक्षाबंधन सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. यावेळी शुटिंगसाठी दिल्लीतील प्रसिद्ध चांदनी चौकाचा सेट उभा केला गेला आहे. यावेळी अक्षयने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अक्षयचा जन्म दिल्लीतील चांदनी चौक एरियात झाला होता. लहानपण तिथे गेल्यामुळे अक्षयच्या ब-याच आठवणी त्या जागेशी निगडीत आहेत.
आज त्याने या आठवणींसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘रक्षाबंधनच्या सेटवर आजची सकाळ मला आठवणींच्या जगात घेऊन गेली. ही सकाळ माझं जन्मस्थान चांदनी चौकमधील आहे. आसपासच्या लोकांची वर्दळ खुपच सुखदायी आहे.’ रक्षाबंधनसाठी अक्षयने त्याचं वजन वाढवलं आहे. हिमांशु शर्मा आणि कनिका ढिल्लन लिखित , आनंद एल राय द्वारा दिग्दर्शित, रक्षाबंधन ही फिल्म केप ऑफ गुड फिल्म्स असोसिएशन सह कलर यलो प्रॉडक्शन ची फिल्म आहे.