By  
on  

अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांची पुन्हा हेराफेरी

अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या त्रयींचा सुपरहिट सिनेमा पुन्हा एकदा रसिकांचं मनोरंजन करायला सज्ज झाला आहे. या सिनेमाचा तिसरा भाग कधी रिलीज होणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागून राहिलं होतं. पण या सिनेमासंबंधी महत्वाची बातमी नुकतीच समजली आहे. या सिनेमाचं शुटिंग वर्षाखेर पर्यंत सुरु होईल.

फिरोज नाडियाड्वाला या सिनेमाची निर्मिती करत आहेत. इंद्र्कुमार या सिनेमाचे दिग्दर्शक असतील. सध्या या सिनेमाच्या पटकथेवर काम सुरु आहे. या सिनेमाच्या अर्ध्या पटकथेचं काम पूर्ण झालं आहे. टोटल धमालनंतर या सिनेमाच्या पुढील कथेवर काम सुरु होईल. खरंतर या सिनेमाच्या शुटिंगची सुरुवात सप्टेंबरमध्येच होणार होती पण काही कारणास्तव ही तारीख लांबत गेली. याशिवाय कलाकारांची नाराजी, पैशाची कमतरता अशा अनेक कारणामुळे या सिनेमाची सुरुवात उशीरा झाली आहे. पण हा सिनेमा अखेरीस ट्रॅकवर आल्याचं पाहून चाहत्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive