सेलिब्रिटी कपल राकेश बापट आणि रिध्दी डोगरा या क्यूट कपलचं चाहत्यांना नेहमीच अप्रूप वाटतं. मर्यादा मालिकेतील ऑनस्क्रीन केमस्ट्रीपासून दोघांमध्ये ऑफस्क्रीन केमिस्ट्री रंगण्यास सुरुवात झाली. पण आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे.
अभिनेता राकेश बापट याने नुकत्याच एका प्रसिध्द इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आपण पत्नी रिध्दी डोगरासोबत घटस्फोट घेत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तो म्हणतो,"हो मी आणि रिध्दीने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आमच्यात अजूनही मैत्रीचं नातं आहे. आम्ही आधी पती-पत्नीपेक्षा मित्र होतो आणि आत्तासुध्दा मित्र म्हणूनच राहू. आमच्यातील मैत्री कायम राहील."
वेगळं होण्याच्या निर्णयावर राकेशला जेव्हा याचं कारण विचारण्यात आलं, तेव्हा तो म्हणाला "यासाठी कोणतंही खास कारण नाही. आम्ही अजूनही एकमेकांवर प्रेम करतो पण आता आमच्या प्रेमाच्या परिभाषा बदलल्या आहेत."
तर दुसरीकडे रिध्दीने एका अधिकृत वृत्तात म्हटलं आहे, आम्ही हा वेगळं होण्याचा निर्यण एकत्रितपणे घेतला आहे. यात आमच्या दोघांच्याही कुटुंबांचा आम्ही विचार केला आहे. पण आमच्यातली मैत्री अद्यापही अबाधित आहे. आम्ही एकमेकांचे मित्र म्हणून नेहमीच राहू. तुमच्या सर्वांचं आमच्यावर नेहमीच प्रेम असू द्या"
राकेश आणि रिध्दी या टीव्ही सेलिब्रिटी जोडीने 2011 साली विवाह केला होता. आत्ता तब्बल 7 वर्षानंतर आपलं नातं संपविण्याचा निर्णय घेतला आहे. पण अजूही ह्यांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण कोणीच स्पष्ट केलेलं नाही.