By  
on  

‘मीटू’ प्रकरणात तापसीने पहिल्यांदाच सोडलं मौन, वाचा काय म्हणते ती

बॉलिवूडमध्ये तापसी पन्नू या नावाची खास ओळख आहे. तापसीने आजवर अनेका सिनेमात दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. उत्तम अभिनेत्री असलेली तापसी संवेदनशील व्यक्तीही आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून आपले विचार स्पष्टपणे मांडायला ती जराही कचरत नाही. आताही तापसीने एका महत्वाच्या मुद्द्यावर मत व्यक्त केलं आहे.

तापसीने ‘मीटू’ प्रकरणात महिलांची बाजू घेतली आहे. तापसी म्हणते, ‘ एखाद्या व्यक्तीवर शोषणाचे आरोप लागत असतील तर त्या व्यक्तीला शिक्षा व्हायलाच हवी. असं झालं नाही तर संबंधित महिलेचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल. अन्याया विरुद्ध लढताना अडचणी नक्कीच येतील. पण आपण त्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. तापसीने हे विधान विकास बहलला क्लीनचीट मिळाल्यानंतर काहीच दिवसात केलं आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive