बॉलिवूड कलाकार आणि मिडिया यांच्यातील वादांच्या अनेक बातम्या समोर येत असतात. अलीकडेच एका सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मिडिया यांच्यातील वादाच्या चर्चा सोशल मिडियावर रंगल्या होत्या. एकीकडे मिडियाने अभिनेत्रीकडून माफीची मागणी केली आहे तर अभिनेत्रीने माफी मागण्यास सपशेल नकार दिला आहे. अभिनेता अक्षय कुमारला ‘मिशन मंगल’च्या ट्रेलर लाँचवेळी याबद्दल विचारल गेलं.
Video: This what @akshaykumar has to say on #KanganaRanaut and media ongoing controversy#MissionMangal #MissionMangalTrailer@taapsee @SonakshiSinha @vidya_balan@TheSharmanJoshi @menennithya@IamKirtiKulhari @Jaganshakti @foxstarhindi#HopeProductions pic.twitter.com/gUEiEAtHyU
— PeepingMoon (@PeepingMoon) July 18, 2019
अक्षय यावर मत व्यक्त करताना म्हणतो, ‘मिडिया आणि बॉलिवूड कलाकारांचं नातं जणू नवरा-बायकोचं नातं आहे. अशा छोट्या कुरबुरी लवकर मिटल्या जाव्यात असंच आम्हाला वाटतं. आम्हाला मिडियाची खुप गरज आहे. मिडिया असं एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे आमचं म्हणणं फॅन्सपर्यंत पोहोचवता येतं. सध्याच्या घटनेबद्दल मला जास्त माहिती नाही कारण मी 20 दिवस लंडनमध्ये आहे. अक्षयचा ‘मिशन मंगल’ हा सिनेमा 15 ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येणार आहे.